top of page

धोंड्याचा महिना
मार्गदर्शक आणि सल्लागार
To play, press and hold the enter key. To stop, release the enter key.












शोध नव्याचा


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने भारतीय कृषी उत्पादनात वृद्धीच्या अभूतपूर्व संधी
डॉ. मनीषा खळदकर आणि एस. डी. कामत कृषिप्रधान भारत देशातील अर्ध्याहून अधिक जनता उपजीविकेसाठी शेती व पूरक उद्योगांवर अवलंबून आहे. तरीही दुर्दैवाने सध्या शेती हा अतिशय बेभरवश्याचा व्यवसाय झाला आहे. कमी आणि अनियमित आकाराची शेते, अवकाळी पडणारा पाऊस, शेत मालाला मिळणारा बदलता भाव, मातीचा पोत व पिकांवर पडणारा रोगांचा प्रादुर्भाव या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकऱ्याची चिंता, दारिद्र्य , व्यसनाधीनता किंवा कधी कधी आत्महत्या सुद्धा. ज्या युगात तंत्रज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर भारत ए


क्लोन
डॉ. रंजन गर्गे गेल्या महिन्या भरापसून ‘बर्थ पॉड हॉस्पिटल’ मध्ये कामाचा ताण चांगलाच वाढला होता. जवळ जवळ १५० बर्थ पॉड्स वेगवेगळ्या वेळी बालकांना जन्म देणार होते. गेली सहा महिने अंतराळवीर अपर्णा श्रेष्ठी या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ‘फ्रेंडशिप’ मध्ये मोहिमेवरच होत्या. अत्यंत साहसी अशा या अंतराळ वीरांगनेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत हे आगळं वेगळं असं क्षेत्र निवडलं होतं. श्रेष्ठी यांनी त्यांची मैत्रीण आणि गायनाकॉलॉजिस्ट डॉ. आर्या यांना आपल्या ‘स्तन पेशी’आणि ‘कातडीच्या पेशी’ फ्रेंड


सेमीकॉन २०२५: भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
श्री संजीव केसकर मराठी अनुवाद: डॉ. रोहिणी कुळकर्णी (पांढरे) दिल्ली येथे सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या “सेमिकॉन 2025” मध्ये ४५ पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगात एक वेगाने विकसित होणारी अर्थ व्यवस्था म्हणुन आपला देश प्रगती करत आहे. सेमीकंडक्टर (अर्ध वाहक) या क्षेत्रात असलेल्या उपलब्ध संधी पहाता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना राबवून जगभरातील या क्षेत्रातील बलाढ्य कंपन्याना आपल्या देशात व्यवसाय करण्यासाठी योग्य ते वाताव
स्व. जयंतराव सहस्रबुद्धे स्मृती व्याख्यान - २०२६
भारतीय ज्ञान परंपरा : ‘स्व’ भावनेची पुनर्स्थापना
व्याख्याते – श्री. प्रमोद जी बापट

विज्ञान लेख आणि कथा


न प्रकाशता चंद्राचे प्रकाशणे
श्री. विठ्ठल रायगावकर या लेखात चंद्राभोवती गुंफलेल्या लोककथा, पौराणिक संदर्भ आणि वैज्ञानिक माहिती यांचा सुंदर संगम आहे. सुरुवातीला मुल्ला नसरुद्दीन यांची विनोदी कथा सांगितली आहे, ज्यात ते विहिरीतील चंद्राचे प्रतिबिंब खरे मानून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पुढे गणपती आणि चंद्राची कथा तसेच दक्ष प्रजापती, रोहिणी आणि चंद्र यांची पौराणिक कथा दिली आहे, ज्यातून चंद्राच्या कला समजावून सांगितल्या आहेत. लेखात चंद्राचे सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित केले आहे—सण, व्रतवैकल्य, पौर्


स्वदेशी विमानवाहू युद्धनौका : आय एन एस विक्रांत
काशीनाथ दामोदर देवधर मागच्या वर्षीच्या दिवाळीतील सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 हा दिवस भारतीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. कारण भारताचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे दिवाळी गोवा येथे स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय. एन. एस. विक्रांतच्या नौसैनिकांसमवेत साजरी केली. आय. एन. एस. विक्रांत युध्दनौकेवरून देशाला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूर मधील शौर्या बद्दल तीन्ही सेनांच्या बहादूर जवानांना वंदन करून स्वदेशी शस्त्रास्त्रा


√2 अपरिमेय का आहे?
किरण बर्वे √2 ही संख्या गणितातील एक अत्यंत रोचक संख्या आहे, जी अपरिमेय संख्या या संकल्पनेत येते. प्राचीन भारतातील अनेक गणितींनी यावर विचार केल्याचे पुरावे मिळतात. तसेच प्राचीन ग्रीक गणितज्ञ पायथागोरस यांच्या शिष्यांनी प्रथम √2 ही संख्या अपरिमेय असल्याचे शोधले असाही दावा केला जातो. अपरिमेय संख्या म्हणजे ती दोन पूर्णांकांच्या भिन्नरूपात व्यक्त करता येत नाही. ही संख्या विशेषतः पायथागोरस सिद्धांत मध्ये दिसून येते. जर एखाद्या चौरसाची बाजू 1 असेल, तर त्याचा कर्ण √2 इतका येतो. या सा


कोरा कागद..काळी शाई…
अनिता जोशी आज मुद्रण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लिहिणे, छापणे अगदी सहज आणि सोपे झाले असले, तरी पूर्वी लेखन ही एक अत्यंत कष्टसाध्य प्रक्रिया होती. हस्तलिखिते लिहिताना केवळ अक्षरे उतरवणेच नव्हे, तर कागद तयार करणे, शाई बनवणे आणि लेखनासाठी आवश्यक साधनांची तयारीसुद्धा करावी लागत असे. या साऱ्या प्रक्रियांचा मागोवा घेणारा, लेखनाच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. भावनांच्या अभिव्यक्तीचे साधन म्हणजे शब्द. तीच वैखरी, तिचे चित्रांकन म्हणजे लिपी, आपण उच्चारलेला मजकूर दीर्घकाळ टिकाव


एका टँकरची कहाणीआणि पेरूच्या खुट्टीने वाचलेले हजारो जीव
संकॆत रा. वक्ते व डॉ. सुचेता गायकवाड या कथात्मक लेखात मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील प्रोपिलीन वायूच्या टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर विज्ञान, आपत्कालीन व्यवस्थापन आणि निसर्गज्ञान यांची सांगड प्रभावीपणे मांडली आहे. गणेश, त्याचे वडील रासायनिक शास्त्रज्ञ डॉ. देशमुख आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोशी यांच्या संवादातून प्रोपिलीनचे वैज्ञानिक स्वरूप, त्याचा संभाव्य स्फोटक धोका, गळतीमुळे होणारे तापमानातील बदल आणि फ्रॉस्टबाइटसारख्या जखमा यांचे सुलभ स्पष्टी करण दिले आहे. पेरूच्या लाकडाच्या
सृष्टिविज्ञान आणि जैवविविधता


आपल्या अंगठीतलेसोने आले कुठून?
डॉ. अश्विन पुंडलिक आजकाल सोने महाग तर झाले आहेच, पण सध्या मा पंतप्रधानांनी परकीय चलन वाचविण्यासाठी नागरिकांनी वर्षभर सोनेखरेदी टाळावी असे आवाहन केल्याने सोन्यावर बरीच चर्चा सुरु झाली आहे. न गंजणाऱ्या , काळपट न पडणाऱ्या, चकाकणाऱ्या या पिवळ्या धातूचे आकर्षण मानवाला बऱ्याच प्राचीन काळापासून आहे. भारतात सिंधू संस्कृतीच्या अवशिष्ट शहरांमध्ये काही ठिकाणी सुवर्णालंकार तर काही ठिकाणी सोने वितळवण्यासाठीच्या भट्ट्याही सापडल्याने भारतीयांचे सोन्याचे आकर्षण पाच-सहा हजार वर्षांपासूनचे तरी


पाऊस पडण्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव: जैविक पर्जन्य
डॉ. रोहिणी कुलकर्णी (पांढरे) पाणी हा जीवनाचा मुलाधार आहे. सजीवांच्या शरीरातील ६० ते ७० टक्के भाग पाण्याने भरलेला आहे. सजीवांना जगण्यासाठी पृथ्वीवरील पाण्याचे जलचक्र अविरत फिरण्याची एक नैसर्गिक व अखंड प्रक्रिया सुरू असते. पृथ्वीच्या उत्पत्ती नंतर येथील वातावरण हे सजीवांना जगण्यायोग्य नव्हते पृथ्वीवर सुश्मजीवांची निर्मिती झाली आणि या सूक्ष्मजीवांच्या क्रिया कलपांद्वारे पृथ्वीवरील जीवन प्रक्रिया अविरत सुरू आहे. सूक्ष्मजीव हे चराचर व्यापुन आहेत आणि ते मृदा, जल आणि वायु चक्रात सहभ


उष्णतेतून उमललेली सृजनकथा: निसर्गाच्या जिद्दीची रंगीत कहाणी
डॉ. दिपेश चिकणे मे महिना (वैशाख आणि ज्येष्ठ) उन्हाळ्याचा परमोच्च बिंदू. जणू सूर्य पृथ्वीच्या अधिक जवळ येऊन तिच्या प्रत्येक कणाला आपल्या उष्णतेने स्पर्श करतो. दुपारच्या वेळी आकाश निळ्याशार पण निर्विकार दिसते; एकही ढग नाही, जणू पावसाची आठवण ही विसरलेले. जमिनीवर उष्णतेच्या लाटा तरंगत असतात, दूरवरचे दृश्य धुसर भासते. वाऱ्याची झुळूकही गारवा न देता उष्णतेचीच जाणीव करून देते. झाडांची पाने कोमेजलेली, काही ठिकाणी पूर्ण गळून गेलेली; नद्या आणि ओढे आटलेले; मातीचा सुगंधही कोरडेपणा त हरवले


धृवीय प्रकाश: निसर्गाची किमया
डॉ. सुधाकर आगरकर आपल्या पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण असे दोन धृव आहेत. या धृवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना धृव मात्र स्थिर असतात. हे दोन्ही धृव समुद्राने वेढलेले आहेत. उत्तर धृवाजवळ असलेल्या समुद्राला आर्क्टिक्ट तर दक्षिण धृवाजवळ असलेल्या समुद्राला अंटार्क्टिक समुद्र असे म्हणतात. सूर्य उत्तरायणात असताना अंटार्क्टिक समुद्र तर सूर्य दक्षिणायनात आर्क्टिक समुद्र गोठते. हिवाळ्यात इथे काही दिवस सूर्यदर्शन होत नाही तर उन्हाळ्यात काह ी दिव स सूर्य माव ळतच नाही. अशा
भारतीय ज्ञान परंपरा आणि अध्यात्म विज्ञान


भारतीय ज्ञानपरंपरेतील सूक्ष्म विज्ञान
“अक्षय तृतीया आणि हनुमान जयंती : खगोलशास्त्र, आयुर्वेद आणि सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास” डॉ. दीपेश चिकणे भारतीय संस्कृतीतील सण हे केवळ धार्मिक श्रद्धांचे प्रतीक नसून निसर्ग, विज्ञान, आरोग्यशास्त्र आणि सामाजिक व्यवस्थेचा सखोल विचार दर्शवणारे आहेत. वैशाख महिन्यात साजरे होणारे अक्षय तृतीया आणि हनुमान जयंती हे दोन सण भारतीय ज्ञानपरंपरेतील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जातात. या सणांमध्ये खगोलशास्त्र, आयुर्वेद, पर्यावरणशास्त्र, मानसशास्त्र आणि सामाजिक विज्ञान यांचा सु


गणित म्हणजे नक्की काय ?
जगदीश काबरे गणित म्हणजे नक्की काय? संख्या म्हणजे काय? आणि अनुभवाशिवाय गणित कसे उभे राहते? हे प्रश्न प्रथमदर्शनी कठीण वाटतात, पण थोडा विचार केला तर ते प्रश्न कठीण नसतात हे आपल्या लक्षात येईल. गणित म्हणजे केवळ आकड्यांच्या बेरीज-वजाबाकीचे शास्त्र नाही; तर ते त्याहून खूप व्यापक आहे. आपण म्हणतो ते ‘तीन’, ‘दहा ’, ‘शंभर’ हे आकडे स्वतः वस्तू नसतात. ‘तीन’ हा आकडा दिसत नाही; दिसतात त्या तीन वस्तू. उदा. तीन सफरचंद, सात दगड आपण त्या वस्तूंच्या मोजणीतून ‘तीन’ म्हणजे किती, ’सात’ म्हणजे कित


मंदिर: ऊर्जा,वास्तू आणि विज्ञान - दगडात साकारलेली ज्ञानपरंपरा
डॉ. उज्ज्वला खोत भारतीय मंदिर बांधकामात विज्ञान आणि खगोलशास्त्र यांचा अद्भुत संगम दिसून येतो. प्राचीन काळातील वास्तुकारांनी मंदिरांची रचना करताना सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या हालचालींचा सूक्ष्म अभ्यास केला होता. अनेक मंदिरांची दिशा अशी ठरवली जाते की विशिष्ट दिवसांमध्ये, जसे संक्रांती, सूर्यकिरणे थेट गर्भगृहातील मूर्तीवर पडतात. उदाहरणार्थ, कोणार्क सूर्यमंदिर हे सूर्याच्या गतीनुसार उभारलेले असून त्याची रचना एक भव्य रथासारखी आहे. तसेच, मंदिरातील शिखरे, मंडप आणि स्तंभ यांचे प्र


प्रतिबिंब पाहे बिंबातें
विठ्ठल रायगावकर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यात्मातील विविध संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक अनेक दृष्टांत दिलेले आहेत. “प्रतिबिंब पाहे बिंबातें’’ हा असाच एक विज्ञान क्षेत्रातील दृष्टांत आहे. ह्याचा धागा पकडून आपण बिंब आणि प्रतिबिंब या शब्दांच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू या. आम्हाला लहानपणी दुसरीच्या वर्गात “आरसा हसला आरसा रडला” अशा शीर्षष्घकाचा एक छान धडा होता बालभारतीच्या पुस्तकांमध्ये. तो एक कुणीतरी मुलगा सकाळी उशिरा उठतो आणि पटपट त
भारतीय संशोधन संस्था परिचय आणि भारतीय वैज्ञानिक


जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था
अनघा शिराळकर जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था ही आपल्या देशातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. मुलभूत जनुकीय जीवशास्त्राचा अभ्यास करून देशातील सार्वजनिक आरोग्य उत्तम कसे राहील या दृष्टीने ही संस्था कार्य करत आहे. मानवी गुणसूत्रांचा झालेला अभ्यास लक्षात घेता वेगवेगळ्या दुर्मिळ व्याधी दूर करण्यासाठी जनुकीय उपचार पध्दती विकसित करणे, वेळोवेळी येणाऱ्या साथीच्या रोगांसाठी कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंचा जनुकीय अभ्यास करून त्यावर प्रभावी औषधोपचार कसे करता येईल या बाबींचा अभ्या


कॅलिडोस्कोपमधील जीवनदर्शन: डॉ. हेमलता दत्तात्रय साने यांचे विज्ञान,साहित्य आणि शाश्वततेचे बहुरंगी विश्व
डॉ वर्षा निंबाळकर डॉ. हेमलता दत्तात्रय साने (१९४०–२०२५) या वनस्पतीशास्त्रज्ञ, समर्पित शिक्षिका, लेखिका आणि पर्यावरणप्रेमी विदुषी होत्या. त्यांच्या कार्याचा आवाका कॅलिडोस्कोपप्रमाणे बहुरंगी असून विज्ञान, साहित्य आणि भारतीय ज्ञानपरंपरा यांचा सुरेख संगम त्यात दिसतो. चार दशके अध्यापन करत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्राची गोडी लावली. संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांनी विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवले. शाश्वत जीवनशैली, निसर्गाशी तादात्म्य आणि मा


शैक्षणिक प्रशिक्षणातून सामाजिक व औद्योगिक नवोन्मेषाकडे: भिडे फाउंडेशनचा प्रवास
डॉ. प्रशांत शरद दुराफे शिक्षण प्रसारक मंडळींच्या प्रि. बि. व्ही. भिडे फाउंडेशनची स्थापना १९९७ साली स. प. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास व संशोधनाभिमुख शिक्षणासाठी झाली. आयुर्वेद, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व वनस्पती उती संवर्धन या क्षेत्रांत प्रशिक्षण, चाचणी व अनुप्रयुक्त संशोधन हे फाउंडेशनचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. आयुर्वेदिक औषधे, पर्यावरणपूरक भस्मनिर्मिती, फळांच्या सालींपासून पेक्टिन व सॅनिटायझर निर्मिती, तसेच सुगंधी रसायनांचे प्रक्रिया प्रमाणीकरण असे अन


ला कॉन्झ: न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) भारतीय प्रयोगशाळा
श्री. नारायण वाडदेकर ला कॉन्झ म्हणजे ‘कॉन्झर्वेशन ऑफ एन्डेन्जर्ड स्पिसीस - Conservation of Endangered Species’ ही एक हैदराबाद, तेलंगणामध्ये स्थापित एकुलती एक न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) भारतीय प्रयोगशाळा आहे. वनातील प्राण्यांच्या शिकारीचा गुन्हा आधुनिक वैज्ञानिक चाचण्यांच्या मदतीने न्यायालयात सिद्ध होईल आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल याची तजवीज ‘ला कॉन्झ’ करते. हा विज्ञानाचा व्यावहारिक फायदा आहे. ला कॉन्झ ही एक भारतीय न्यायवैद्यसहाय्यक प्रयोगशाळा आहे. तिचे नाव ‘कॉन्झर्वेश न ऑफ एन्ड
संपूर्ण अंक
bottom of page



